07:17pm | Oct 03, 2018 |
मुंबई : विंडीजविरुद्ध गुरुवारपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा १२ खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCIने सौराष्ट्र क्रिकेट च्या मैदानावर उसळती खेळपट्टी बनवण्याची मागणी केली होती. त्यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांना अधिक पसंती असेल तर तीन पैकी केवळ २ फिरकीपटूना संघात स्थान मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पृथ्वी शॉ ला संघात संधी मिळाल्यामुळे मयांक अग्रवालचे पदार्पण लांबणीवर पडले आहे. तसेच मोहम्मद सिराजला देखील अंतिम संघात स्थान मिळालेले नाही. संघात ३ वेगवान गोलंदाजांनाही स्थान देण्यात आले आहे.
पृथ्वी शॉच्या निवडीनंतर उपकर्णधार मुंबईकर अजिंक्य रहाणे याने आनंद व्यक्त केला आहे. ‘पृथ्वी शॉचा संघात समावेश करण्यात आल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी त्याला अगदी लहान असल्यापासून खेळताना पाहतो आहे. आम्ही नेटमध्ये एकत्र सराव केला आहे. तो आक्रमक सलामीवीर आहे. त्याची भारत अ संघातील कामगिरी अत्यंत उल्लेखनीय होती. त्याचेच फळ त्याला मिळाले आहे, अशा शब्दात रहाणेने त्याचे कौतुक केले.
१२ खेळाडूंचा संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |