02:10am | May 10, 2019 |
सातारा : दुष्काळ जन्य परिस्थितीत तातडीने निर्णय राज्यशासनाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र राज्य शासन दुष्काळी धोरणाबाबत विलंब करत आहेत. जिल्हयातील चारा छावण्यांच्या संदर्भात राज्य शासनाने निर्णय घेतले ते वास्तवतेपासून दूर आहे. अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात साठाव्या कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. स्व. राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान मोदी यांनी अनेक आरोप केले त्या विषयी बोलताना पवार म्हणाले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी ही व्यक्ती आज हयात नाही. ज्या कुटूंबातील दोन व्यक्ती देशाच्या पंतप्रधान झाल्या, त्यांच्या हत्या झाल्या. गांधी परिवाराचा देशासाठी मोठा त्याग आहे. अशा व्यक तीविषयी देशाच्या सर्वोच्च व्यक्तींनी अशोभनीय वकतव्ये करू नये असे नैतिकतेला धरून नाही. दरम्यानं देशात परिवर्तनाला अनुकुल वातावरण आहे. सत्ताधारी विरोधकांची मोट बांधून त्यांची एकवाक्यता असणे महत्वाचे आहे असे पवार यांनी स्पष्ट करत महाराष्ट्रात सरकार दुष्काळाच्या निर्णयासंदर्भात विलंब होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शरद पवारांनी रयत शिक्षण लोकसभा निवडणुकांच्या संभाव्य प्रश्नांवर बोलताना पवार म्हणाले घटक पक्षामध्ये एकवाक्यता निर्माण करून बहूमत कसे करता येईल याचा विचार सुरू आहे. मी काही ज्योतिष म्हणून सांगत नाही पण, देशात परीवर्तनासाठी अनकूल वातावरण आहे. महाराष्ट्रासह देशात चांगल्या जागा काँग्रेस महाआघाडीला मिळतील असा दावा पवार यांनी यावेळी बोलताना केला.
पवार यांनी देशातील सर्व घटक पक्षांची बैठक 21 रोजी आयोजीत केली आहे. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाची संधी यावेळी मिळणार का? दुष्काळ प्रश्नी विरोधकांकडून राजकारण केले जात आहे, असे आरोप सत्ताधार्यांकडून केले जात आहेत. या प्रश्नांना उत्तरे देताना शरद पवार म्हणाले, बैठक आयोजीत केली आहे. किती सहभागी होतील मला माहिती नाही. पंतप्रधान पदाची संधी कोणत्या राज्याला मिळेल, कोणाला मिळेल हा भाग सध्या आमच्या आघाडीच्या दृष्टीने गौण आहे. प्रथम आम्हाला परीवर्तन हवे आहे. परीवर्तनासाठी पोषक वातावरण आहे की, नाही हा खरा प्रश्न आहे. मला स्वत:ला असे जाणवत आहे की, देशात परीवर्तनासाठी सोयीची अशी अनुकूल परिस्थिती दिसली आहे. त्यासाठी सर्व घटक पक्षांना एकत्र घेवून बसावे लागणार आहे. सर्वांना एकत्र आणून एकवाक्यता निर्माण करावी लागणार आहे. जो पर्यंत ही प्रकी्रया होत नाही तोपर्यंत कोणाला पंतप्रधान याची चर्चा सुध्दा केली जाणार नाही. आम्हाला पहिल्यांदा एकवाक्यता निर्माण करून बहुमत करायचे आहे. आणि पाच वर्षे स्थिर सरकार द्यायचे आहे. पाच वर्षापुर्वी निवडणुका झाल्या त्यावेळी आम्हाला 6 जागा मिळाल्या होत्या. त्यामध्ये चार राष्ट्रवादी आणि दोन काँग्रेसला. यावेळी तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रातील जागांचा आकडा वाढलेला दिसेल. तसेच देशातील जागाही वाढलेल्या दिसतील. काही ठिकाणी यश मिळेत पण मताधिक्य कमी असेल. देशाचे चित्र परीवर्तनासाठी अनुकल असे दिसत आहे. सातारची जागा येईल पण किती मतांनी येईल हे सांगता येत नाही.
राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आचार संहितेमुळे निर्णय घेता येत नाहीत. यावर शरद पवार म्हणाले, आचारसंहितेची मर्यादा ही राज्यसरकारला व अधिकार्यांनी निर्णय घेवू नये यासाठी असते. परंतु ज्यावेळी राज्यात पाण्याचे संकट, चार्याचा प्रश्न अथवा दुष्काळजन्य गंभीर परीस्थिती निर्माण होते. त्यावेळी आयोग अशा प्रश्नांना तातडीने परवानगी देतो असे माझे मत आहे. आयोगाला उदभवलेल्या परिस्थितीची माहिती समजावून सांगीतली पाहिजे. आचार संहिता आहे म्हणून निर्णय घेण्यास विलंब लावणे योग्य नाही. दुष्काळप्रश्नी तातडीने निर्णय धेतले गेले पाहीजेत, ते घेतले गेले नाहीत. जे निर्णय घेतले गेले ते वास्तवतेपासून दूर घेतले गेले आहेत. कडब्याचे भाव बघीतले तर सरकार चारा छावणीतील एका जनावराला 90 ते 95 रूपये देत आहे ते न परवडणारे आहे. म्हणून मी भाष्य केले, महसुल मंत्र्यांवर टिका केली नाही. दुष्काळप्रश्नी जे निर्णय घेतले गेले आहेत. त्यामध्ये दुरूस्ती करण्यासाठी आम्ही पक्षाची बैठक ेघेतली. प्रमुख लोकांची टिम तयार केली. घेतलेल्या निर्णयामध्ये दुरूस्ती सुचविण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, छगन भूजबळ यांच्यासह आणखी काही जण गेले होते. या प्रश्नाचे राजकारण करायचे नाही. फक्त राज्य सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावे एवढा हेतू होता असे शेवटी पवार यांनी सांगीतले. यावेळी आ. शशिकांत शिंदे यांची उपस्थिती होती.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |