कराड : संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यांनी आणला ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे. सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी झाला पाहिजे हेच उद्दिष्ठ ठेऊन निवडणुकीस सामोरे जात आहे. यामुळे जनतेचा विकास करण्यासाठी मी बाहेर पडलो आहे, अशी प्रतिक्रिया सेना, भाजपा व आरपीय महायुतीचे उमेदवार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
येथे शनिवारी सकाळी ज्येष्ठ नेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते पत्रकारांशी बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा ज्योतिराव फुले व ज्येष्ठ नेते स्व. पी. डी. पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते अर्ज दाखल करण्यासाठी सातारला रवाना झाले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, डॉक्टर प्राची पाटील, भाजप शहराध्यक्ष एकनाथ बागडी, शिवसेना तालुकाप्रमुख शशिकांत कापसे, प्रमोद तोडकर, शिवसेना महिला आघाडी अनिता जाधव, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा संघटक, सुदर्शन पाटसकर शिवसेनेचे रामभाऊ रैनाक उपस्थित होते.
पाटील म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला या महानपुरूषाचा आशिर्वाद घेऊन अर्ज दाखल करत आहे. सातारा जिल्हा गेल्या दहा वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. जिल्ह्यामध्ये औद्योगिक, शैक्षणिक, बेरोजगारी, पर्यटन, रेल्वेचा प्रश्न, जिल्ह्यातील दुष्काळ संपवण्यासाठी धारणातील पाण्याचा प्रश्न हे मुद्दे घेऊन निवडणुक लढवत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे नागरिकांची सेवा करत आहेत. त्यांनी देशाला भरभरून असे काही दिले आहे. सत्तेचा वापर हा जनतेच्या विकासासाठी, समाजासाठी व गावाच्या विकासासाठी व्हावा. पण काही राज्यकर्त्यांनी स्वतःचा व सहकार्यांचा विकास हेच धोरण राबविले आहे. यामुळे जनतेच्या विकासासाठी मी बाहेर पडलो आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |